ठेकेदाराचा हलगर्जीपणा प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची शक्यता?

जनदूत टिम    27-May-2024
Total Views |
महाड वरंध घाट कागदोपत्री बंद ? प्रत्यक्षात मात्र वाहतूक सुरूच
ठेकेदाराचा हलगर्जीपणा प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची शक्यता?
 
महाड - रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील म्हाप्रळ पंढरपूर मार्गावरील वरंधा घाट कागदोपत्री बंद असला तरी प्रत्यक्षात मात्र वाहतूक आजही खुलेआमपणे सुरू आहे यामुळे पावसाळ्या पूर्वीच वरंधा घाट धोकादायक बनला आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ठिकठिकाणी धोकादायक स्थिती असून हा हलगर्जीपणा प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची शक्यता या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या असंख्य वाहन चालकांनी व्यक्त केली आहे.

म्हाप्रळ पंढरपूर मार्गावरील वरंधा घाट
 
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातून जाणारा व पुणे जिल्ह्याला जोडणारा . हा .मुख्य रस्ता असून म्हाप्रळ पंढरपूर मार्ग हा पुणे जिल्ह्याला जोडणारा जवळचा मार्ग असल्याने गेली अनेक वर्षापासून या मार्गावरून वाहतूक सुरू आहे हा घाट अरुंद असल्याने यापूर्वी अनेक अपघात देखील झाले आहेत . सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील हा रस्ता आता . राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या माध्यमातून या रस्त्याचे रुंदीकरण होत आहे या रुंदीकरणासाठी करोडो रुपये मंजूर झाले आहेत मात्र गेली दोन वर्षापासून महाप्रळ पासून सुरू असलेला हा रस्ता अद्याप महाड पर्यंत पूर्ण झालेला नाही अत्यंत घिम्या गतीने सुरू असलेल्या या कामामुळे नागरिकांचे मात्र प्रचंड हाल झालेले आहेत.
 
सन २०२१ च्या अतिवृष्टी मध्ये माझेरी, पारमाची यादरम्यान . हा घाट जागोजागी खचला होता तर अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने रस्ता तब्बल आठ महिने बंद होता त्यानंतर करोडो रुपयांच्या संरक्षक भिंती उभारून हा मार्ग सुरू करण्यात आला. सद्यस्थितीत वाघजाई पासून ढालकाटीपर्यंत जागोजागी मातीचा भराव संरक्षक भिंती उभी करण्यासाठी केलेले खोदकाम आणि छोट्या-मोठ्या आलेल्या दरडी आजही तशाच असल्याने घाटामध्ये धोकादायक स्थिती निर्माण झालेली आहे.

म्हाप्रळ पंढरपूर मार्गावरील वरंधा घाट
 
रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी एक महिन्यापूर्वी रस्त्याच्या कामाकरता हा घाट बंद राहील असा आदेश दिला होता मात्र प्रत्यक्षात घाट आजही सुरूच आहे. रस्त्यात टाकलेल्या दगडी मातीचा भराव बाजूला करून वाहन चालक घाटातून मार्ग काढत प्रवास करत आहेत. मे महिन्याच्या काळात आणि पावसाळ्याच्या तोंडावर घाटामध्ये ठीक ठिकाणी संबंधित ठेकेदाराकडून खोदकाम करून संथ गतीने काम सुरू आहे. घाटात केलेला खोदकामामुळे पावसाळ्याच्या काळात दगडी किंवा मातीचा भराव रस्त्यावर येण्याची शक्यता आहे.
 
वरंधा घाट बंद करण्याचे हेतूने रस्त्यामध्ये मोठ्या दगडी ठेवण्यात आलेल्या आहेत मात्र या दगडी तात्पुरत्या स्वरूपात बाजूला केल्या गेल्या आहेत. घाटामध्ये पसरणाऱ्या धुक्यामधून या दगडी दिसल्या नाहीत तर अपघात होण्याची शक्यता आहे. यामुळे घाटातून वाहनांना प्रवास करण्यास हा मार्ग बंद करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे लक्ष आहे कुठे ? महाड मधील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांकडून महाड तालुक्यात सुरू असलेल्या रस्त्यांच्या बाबतीत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. तालुक्यातील किल्ले रायगड मार्ग, म्हाप्रळ पंढरपूर रस्ता त्याचप्रमाणे अंबडवे हे तिन्ही रस्ते आजही अर्धवट अवस्थेत संथ गतीने सुरू आहेत. या रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य असल्याने पाऊस पडल्यानंतर वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे ठिकठिकाणी रस्ते अर्धवट ठेवण्यात आलेले आहेत. 
 
म्हाप्रळ पंढरपूर मार्गावरील वरंधा घाट
 
ज्या ठिकाणी रस्त्याची अर्धवट अवस्थेत काम आहे त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचे दिशादर्शक फलक अथवा धोकादायक रस्ता आहे असे कोणतेही फलक लावले नसल्याने वाहन चालकांना रात्रीच्या वेळेस रस्ता कळत नसल्याने अनेक अपघात रात्रीच्या सुमारास घडत आहे अशाच पद्धतीने महाप्रळ भोर पंढरपूर या रस्त्यावर धोकादायक स्थिती आहे मात्र राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अधिकारी कार्यालयातील थंडगार एसी मध्ये बसण्यात व वातानुकूलित यंत्रणेमध्ये बसून डबा खाऊन वामकुशी घेण्यात धन्यता मानत आहेत. कागदपत्री हा घाट बंद असला तरी प्रत्यक्षात मात्र वाहनांची येजा सुरूच आहे यामुळे वाहन चालक आणि प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो. राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या महाडच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा महाडच्या राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे वरंधा घाटामध्ये अपघात झाल्यास राज्य सरकारच्या वतीने व रायगड जिल्हा अधिकाऱ्यांच्या वतीने निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारा सहित राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य उदाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या असंख्य वाहन चालकांकडून होत असून याबाबत लवकरच सामाजिक संघटना राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करणारा असल्याचे समजते